Advertisement

Main Ad

पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन : धर्मादाय कार्यालय सोलापूरचा सामाजिक संस्थांना पुढाकार घेण्याचा आग्रह



सोलापूर, (जिमाका) दि. 1 : अलीकडील मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्यातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. हजारो नागरिक बेघर झाले असून शेती, जनावरे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज असून सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
  धर्मादाय कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र, पिण्याचे पाणी, औषधे आणि तात्पुरता निवारा यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या संकटाच्या काळात पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
  इच्छुक संस्था व व्यक्तींनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्य हाती घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच धर्मादाय रुग्णालयांनी आवश्यक ठिकाणी वैद्यकीय मदत पुरवावी, असे निर्देशही पत्रकात देण्यात आले आहेत.
0000

Post a Comment

0 Comments